Dada Bhagwan Vignan Foundation
trimantra
trimantra
Couldn't load pickup availability
धर्मात माझे-तुझे करून भांडणे होतात. ती भांडणे मिटविण्यासाठी निष्पक्षपाती त्रिमंत्र आहे. या त्रिमंत्राचा मूळ अर्थ जर समजला तर त्याचा कोणत्याही व्यक्ति, संप्रदाय किंवा कोणत्याही पंथाशी काहीही संबंध नाही. आत्मज्ञानीपासून ते अंतत: केवळज्ञानी आणि निर्वाण प्राप्तिने मोक्षगती प्राप्त करणाऱ्या उच्च जागृत आत्म्यांनाच नमस्कार निर्दिष्टत आहे. आणि त्यांना नमस्कार केल्याने संसारी विघ्ने दूर होतात, अडचणींमध्ये शांति राहते आणि मोक्षाच्या ध्येयाकडे लक्ष्य बांधले जाते. आत्मज्ञानी परम पूज्यश्री दादा भगवानांनी निष्पक्षपाती त्रिमंत्र प्रदान केला आहे, त्याचे सकाळ संध्याकाळ पाच-पाच वेळा उपयोगपूर्वक पठन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संसारिक कार्ये शांतिपूर्वक संपन्न होतात. आणि अगदी कठीण प्रसंगी जर एक-एक तास म्हटला तर सुळीचा घाव सुईने सरेल. निष्पक्षपाती त्रिमंत्राचा शब्दार्थ, भावार्थ आणि तो कसा हितकारी आहे, याचा खुलासा दादाश्रींनी या पुस्तकात केला आहे.
Share
